Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

4 प्रकारच्या अन्न अकाली मृत्यूचे कारण! गीतामधील नियम जाणून घ्या

Food Waste
, बुधवार, 6 मार्च 2024 (05:28 IST)
सनातन धर्मात अनेक धार्मिक ग्रंथ आहेत. धर्म आणि जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी त्या ग्रंथांमध्ये तपशीलवार वर्णन केल्या आहेत. त्या धार्मिक ग्रंथांमध्ये सांसारिक आणि व्यावहारिक ज्ञानाचे तपशीलवार वर्णन केले आहे. गीतानुसार भीष्म पितामह यांनी अर्जुनला 4 प्रकारचे अन्न न खाण्याचा सल्ला दिला होता. असे मानले जाते की या 4 प्रकारचे अन्न सेवन केल्याने घरामध्ये अकाली मृत्यू आणि गरिबी येते. तर आज आपण जाणून घेणार आहोत की ते कोणते पदार्थ आहेत ज्यांचे चुकुनही सेवन करु नये.
 
पहिले भोजन
गीतेनुसार भीष्म पितामह अर्जुनला सांगतात की, अन्नाच्या ताटावर कोणी उडी मारुन गेले असेल तर ते नाल्यात पडलेल्या चिखलासारखं बनतं. गीतते सांगतात, असे अन्न चुकूनही सेवन करू नये. अन्नाचे ताट चुकून ओलांडले गेले तर ते अन्न एखाद्या प्राण्याला खायला द्यावे. ते स्विकारू नका.
 
दुसरे भोजन
भीष्म अर्जुनला सांगतात की, ज्याच्या ताटात पाय लागले असतील ते अन्न खाण्यास योग्य नाही. गीतेत असे अन्न खाणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पाय मारलेल्या ताटातून खाल्ल्याने घरात गरिबी येते. त्यामुळे असे अन्न खाणे टाळावे.
 
तिसरे भोजन
भीष्म पितामह गीतेद्वारे समजावून सांगतात की, ताटातील अन्नात केस दिसल्यास ते अन्न खाणे कधीही स्वीकार्य मानले गेले नाही. अशा प्रकारचे अन्न दूषित होते. जे लोक ताटात केस असूनही अन्न खातात, ते लवकर गरीब होऊ लागतात.
 
चवथे भोजन
भीष्म पितामह गीतेत स्पष्ट करतात की जर पती-पत्नीने एकाच ताटातून जेवण केले तर ते अन्न एखाद्या मादक पदार्थापेक्षा कमी नाही. भीष्म पितामहांच्या मते एकाच ताटात अन्न खाणे योग्य नाही. मात्र, पती-पत्नीने एकाच ताटातून जेवण खाल्ले तर त्यांच्यातील प्रेम वाढते, असे म्हटले जाते. पण जेव्हा पती-पत्नीच्या जेवणात तिसरी व्यक्ती सामील होते, तेव्हा पती-पत्नीच्या नात्यात अंतर निर्माण होते.
 
अस्वीकरण: येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. यासाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रामदास स्वामींची आरती Samarth Ramdas Aarti