Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी

यामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी
हिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी तांब्याची भांडी वापरणे. अनेक विद्वानांप्रमाणे तांबा पूर्णपणे शुद्ध धातू आहे. कारण तांबा निर्मित करण्यासाठी इतर धातू यात मिसळली जात नाही. तांब्याची भांडी वापरण्यामागील कारण एक कथेत वर्णित आहे.
 
वराह पुराण प्रमाणे पूर्वी गुडाकेश नावाचा राक्षस होता. राक्षस असला तरी तो प्रभू विष्णू यांचा मोठा भक्त होता. प्रभू विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तो कठोर तप करत असे. त्याचा तप बघून प्रसन्न होऊन एकदा विष्णू त्यासमोर प्रकट झाले आणि वर मागायला सांगितले.
 
त्या दरम्यान गुडाकेशाने विष्णूंकडे वर मागितले की- आपल्या चक्राने माझ्या मृत्यू व्हावा आणि माझं पूर्ण शरीर तांब्यात परिवर्तित व्हावे. त्या तांब्याचा वापर पूजेसाठी वापरण्यात येणार्‍या भांडीत व्हायला हवं आणि त्या धातूच्या भांड्याने आपली पूजा केल्यास आपण प्रसन्न व्हावे. यामुळे तांबा अत्यंत पवित्र धातू होईल.
 
प्रभू विष्णूंनी गुडाकेशाला वर दिले आणि वेळ आल्यावर चक्राने त्याच्या शरीराचे अनेक तुकडे केले. ज्यानंतर गुडाकेशाच्या मासाने तांबा, रक्ताने सोनं आणि हाडांनी चांदी निर्मित झाली. या कारणामुळे प्रभूच्या पूजनात नेहमी तांब्याची भांडी वापरणे सुरू झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा