Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

''पहिल्या निवडणुकीत PM साठी मागितले होते मत...", उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावर मागितली माफी

''पहिल्या निवडणुकीत PM साठी मागितले होते मत...
, गुरूवार, 2 मे 2024 (10:37 IST)
लोकसभा निवडणूक 2024 : कोल्हापूरच्या इचारकरंजी मध्ये निवडणूक रॅली दरम्यान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र दौऱ्यावर असतांना मोदी केवळ माझी आणि ठाकरेंची आलोचना करत होते. 
 
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडेल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे ला 11 जागांसाठी होईल. राज्यामध्ये एनडीए आणि महाविकास आघाडी यांमध्ये सामना होणार आहे. यामध्ये दोन्ही युतीचे नेता एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहे. याच दरम्यान एक निवडणूक रॅली मध्ये शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारने महाराष्ट्राला धोका दिला आहे. ते पहिल्या निवडणुकीमध्ये पतंप्रधान यांच्यासाठी मत मागितले याकरिता मी माफी मागत आहे. 
 
उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी एमव्हिए (MVA) चे त्यांचे सहयोगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी हातकणंगले निर्वाचन क्षेत्र मधून शिवसेना युबीटी चे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या समर्थनमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी मध्ये एक रॅलीला संबोधित केले. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी वर्ष 2022 मध्ये महाराष्ट्र सरकार पाडण्याच्या परिस्थीतीचा उल्लेख करतांना म्हणाले की, सुप्रीम कोर्टने यावर आपला निर्णय सांगितला की, असली शिवसेना कोणाची आहे, तरी "निर्वाचन आयोग आणि मध्यस्त महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निर्णय दिला. जे भाजपच्या सेवक रूपात काम करीत होते. 
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा कुठलाच पक्ष भाजपशी हात मिळवत नव्हता, तेव्हा शिवसेनेने त्यांच्या सोबत युती केली होती. ठाकरे यांनी जून 2022 मध्ये आपले सरकार पडण्याचा उल्लेख केला तसेच भाजपने अश्या व्यक्तीच्या सरकारला पाडले ज्याच्या परिवाराने सर्व काही दिले होते. व ठाकरे म्हणाले की, मी मोदींसाठी मत मागितली यासाठी मी माफी मागतो. कारण यांच्या सरकारने महाराष्ट्राला धोका दिला आहे. 

Edited By- Dhanashri Naik  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बहराइच येथे कालव्यामध्ये बुडाल्याने चार मुलांचा मृत्यू