Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केदार जाधवने आमच्या योजनांवर पाणी फेरले: मॉर्गन

केदार जाधवने आमच्या योजनांवर पाणी फेरले: मॉर्गन
इंग्लंडने सुरूवातीच्या चार विकेट घेऊन भारतावर दबाव टाकला होता. पण युवा फलंदाज केदार जाधवच्या शानदार फलंदाजीने आमच्या सर्व योजनांवर पाणी फेरल्याचे मत इंग्लंडचा कर्णधार याने व्यक्त केले आहे. मॉर्गन म्हणाला, मला दु:ख या गोष्टीच आहे की, आम्ही चार विकेट 63 धावांवर घेतले होते. पण त्यानंतर आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाही. आम्ही विचार केले नव्हते की केदार अशी फलंदाजी करेल. त्याने पहिल्या चेंडूपासून मारझोड करण्यास सुरू केली. त्याने म्हटले की, त्याच्या संघाने केदार जाधवबद्दल होमवर्क केला होता.
 
केदारच्या सर्व आंतरराष्ट्रीय मॅचचे व्हिडिओ पाहिले होते. कोहलीबाबतही काही रणनिती आखली होती. पण ती चालू शकली नाही. चेंडू डोक्याच्या वरून निघून गेला नाही तर तो आउट झाला असता. तो खूप चांगला खेळाडू आहे आणि त्याने बर्‍याच काळापासून स्वत:ला‍ सिद्ध केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वरोर्‍यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार