Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रलयकारी पुरामुळे केरळमध्ये वर्षभर दुखवटा

प्रलयकारी पुरामुळे केरळमध्ये वर्षभर दुखवटा
, बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (09:26 IST)
केरळमध्ये आलेल्या भीषण महापूरनंतर आता राज्याच्या पुनर्वसनासाठी सर्वानी कंबर कसली आहे. या परिस्थितीत देशात मनोरंजनाचे आणि आनंदाचे उत्सव व सोहळे साजरे करणे योग्य नाही असे सांगत  राज्यात वर्षभर दुखवटा पाळला जाईल आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल, केरळ युथ फेस्टिवलसह सर्व सोहळे रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री पी विजयन यांनी  केली.
 
प्रलयकारी पुरामुळे केरळचे अपरिमित नुकसान झाले आहे.राज्याला पुन्हा पूर्वीसारखे उभे करण्यासाठी 30 हजार कोटी रुपयांची गरज आहे. देशातून लाखो हात मदतीसाठी पुढे येत आहेत यावरून राज्यावर केवढे भीषण संकट आलेय त्याची प्रचिती येते, असे सांगून मुख्यमंत्री विजयन म्हणाले, राज्य संकटात असताना आनंद सोहळे कसले साजरे करायचे? त्यापेक्षा पुरग्रस्तांचे अश्रू पुसून त्यांचे वेगाने पुनर्वसन करण्यावर आमचा भर असेल असे मुख्यमंत्री विजयन यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्ही केलेले वक्तव्य अत्यंत लच्छनास्पद, राम कदमला आवाहन