Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Chanakya Niti : संकट समोर असेल तर चाणक्य यांच्या या गोष्टी लक्षता ठेवा

Chanakya Niti : संकट समोर असेल तर चाणक्य यांच्या या गोष्टी लक्षता ठेवा
, शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (16:24 IST)
कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागले आहे. चाणक्य नीतीनुसार संकट कधीच सांगून येत नाही. प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी ज्यांची पूर्वतयारी असते, त्यांना तोटा सहन करावा लागत नाही. 
 
कोरोनाच्या बाबतीत चाणक्याचा हा सल्ला अगदी तंतोतंत बसतो. चाणक्य नीती सांगते की जेव्हा संकट मोठे असते आणि हानी करणारा शत्रू दिसत नाही तेव्हा लपून राहणे चांगले.
 
चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये गणले जातात. चाणक्यांना विविध विषयांचे ज्ञान होते. ते तक्षशिलाशी संबंधित होते जे त्याच्या काळातील सर्वात प्रसिद्ध होते. येथे ते विद्यार्थ्यांना शिक्षण देत असत. चाणक्यांना आचार्य चाणक्य आणि कौटिल्य असेही म्हणतात. चाणक्य यांच्या मते, संकटाच्या वेळी कधीही संयम सोडू नये. संकट मोठे असेल तर सर्वांनी संघटित होऊन त्याचा मुकाबला केला पाहिजे. संकटाचा सामना करण्यासाठी चाणक्य यांनी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने नुकसान टाळता येते.
 
संकटाच्या वेळी निष्काळजीपणा हानिकारक सिद्ध होऊ शकतो
चाणक्यच्या मते जर तुम्हाला शक्तिशाली शत्रूचा पराभव करायचा असेल तर सर्वात आधी रणनीती बनवायला हवी. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. चाणक्य नीतीनुसार, संकटाच्या वेळी प्रथम स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यानंतर इतर लोकांनाही याबाबत जागृत केले पाहिजे. कोणतीही लढाई जिंकण्यासाठी नियमांचे पालन करणे फार महत्वाचे आहे. कोरोनासारखे साथीचे आजार टाळण्यासाठी नियमही दिले आहेत. या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे शहाणपणाचे आहे. तरच या शत्रूपासून स्वतःचे व इतरांचे रक्षण करता येईल.
 
शक्तिशाली व्हा
चाणक्य नीतिनुसार कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी आरोग्य चांगले असणे आवश्यक मानले जाते. चाणक्याचा विश्वास होता की आरोग्य चांगले असेल तर कोणताही रोग त्याला स्पर्श करू शकणार नाही.यशासाठी स्वत:चे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. कारण कोणतेही आव्हान केवळ निरोगी असण्याच्या स्थितीतच लढता येते. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत.
 
जागरूकता
चाणक्य नीती म्हणते की जागरूकता ही संकटापासून वाचवते. संकटकाळी जागरुक असायला हवे. शक्य असल्यास, इतरांनाही जागरूक करण्याचा प्रयत्न करा. संकटाला घाबरू नका. योग्य सल्ला, ज्ञान, अनुभव आणि धैर्याने संकट टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बेसनाचे धिरडे; संक्रातीच्या दुसर्‍याची दिवशी करिदिनाला केली जाणारी रेसिपी