Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फळ, भाज्यांसाठी विशेष गाड्या सोडणार

फळ, भाज्यांसाठी विशेष गाड्या सोडणार
फळ आणि भाज्यांची वेळेत वाहतूक होत नसल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी रेल्वे विशेष गाड्या चालविणार आहे. फळ व भाज्या खराब होऊन दरवर्षी ३५ ते ४० कोटींचे नुकसान होते. म्हणूनच या नाशवंत वस्तूंना उत्पादनस्थळापासून ते ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष गाड्या चालविण्यात येतील, अशी घोषणा रेल्वेमंत्री ममता बॅनर्जींनी आज केली. त्यामुळे या भाज्या नाश पावणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. याशिवाय खासगी व सार्वजनिक उद्योगांच्या एकत्रीकरणातून शीतगृह उभारण्याची योजनाही त्यांनी जाहीर केली. यासंदर्भात खासगी क्षेत्राची मदत घेतली जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi