Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपला धक्का, स्वबळावर निवडणुका लढणार शिवसेना, पक्ष ठरवणार करणार पीएम उमेदवार

भाजपला धक्का, स्वबळावर निवडणुका लढणार शिवसेना, पक्ष ठरवणार करणार पीएम उमेदवार
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला धक्का देत म्हटले की 2019 मध्ये पक्षाने लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने म्हटले की 2014 सारखे राजकीय अपघात 2019 मध्ये घडले नाही तर दिल्लीच्या गादीवर कोण बसेल हा निर्णय घेण्यात शिवसेना सक्षम आहे.
 
शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या संपादकीयामध्ये लिहिले आहे की वर्ष 2014 सारखे राजकीय अपघात 2019 मध्ये घडणार नाही. सत्तेचा उन्माद आमच्यावर कधीच चढला नाही आणि चढू देणारही नाही. देशात आज आणीबाणीचे परिस्थिती आहे का? असे प्रश्न केले जात आहे. काश्मिरामध्ये जवानांची हत्या सुरूच आहे.
 
संपादकीयामध्ये दावा करण्यात आला आहे की बहुमताने निवडलेल्या सरकारचा गळा दिल्लीत कसला जात आहे. नोकरशहांचा असा दृष्टिकोन राहिल्यास निवडणूक लढणे आणि राज्य चालवणे कठिण होईल. यात म्हटले आहे की, 'धुळाचे वादळ दिल्लीतच नव्हे तर पूर्ण देशात उठले आहेत. कारण पंतप्रधान नेहमी परदेशात असतात त्यामुळे हे धुळीचे कण त्यांच्या डोळ्यात आणि श्वासात जात नाहीये. जनता परेशान आहे, संकटात आहे. शिवसेनेचा प्रवास कधीच सोपा नव्हता. त्याच्या रस्त्यात नेहमीच खडबडीत रस्त्यातून प्रवास केले आहे आणि पुढेही करत राहील. 
 
उल्लेखनीय आहे की भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच दोन्ही पक्षांमधील ताण कमी करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तरीही दोन्हीमध्ये विवाद चालू आहे.
 
तसेच, वर्ष 2014 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रच्या 48 सीट्समधून भाजप आणि शिवसेनेने 42 सीट्स जिंकल्या होत्या. आणि हे दोन्ही पक्ष पृथक निवडणुक लढले तर येथे राजगला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्टुटगार्ट स्पर्धेत रॉजर फेडररची अग्रस्थानी