Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाप्पा तुम्हीच आता महागाई दूर करा - शिवसेना

बाप्पा तुम्हीच आता महागाई दूर करा - शिवसेना
, शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (14:52 IST)
भाजपा सोबत सत्तेत असलेली आणि केंद्रात, व राज्यात सत्ता करणारी शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर निशाना साधला आहे. सत्तेत असून सुद्धा नेहमीच भाजपवर जोरदार टीका करत आहे. शिवसेनेच्या मुखपत्र समान मधून पेट्रोल डीझेल दर वाढीवर जोरदार टीका केली आहे. २०१४ काळातील महागाईची डायन अर्थात महगाई गेली तर नाही मात्र अजून उग्र स्वरूपात दिसू लागली आहे.देशात जनतेला इंधनाच्या किंमितीने रोज त्रास देत असून, जे जबाबदार आहेत ते आपली जबाबदारी ढकलत असून, आता गणेश तुम्हीच महागाईचे विघ्न दूर करा असे शिवसेना म्हणत आहेत. वाचा शिवसेना काय म्हणत आहे.
 
‘महंगाई डायन’नष्ट व्हावी म्हणून 2014 मध्ये ज्यांना निवडून दिले त्यांच्याच काळात ही ‘डायन’पुन्हा जनतेच्या बोकांडी बसली आहे. त्यात रोजच्या इंधन दरवाढीचा मारही सोसावा लागत आहे. पुन्हा ज्यांनी ही दरवाढ नियंत्रणात ठेवायची, तेच तेलाच्या जागतिक बाजारपेठेकडे बोट दाखवीत आपली जबाबदारी ढकलत आहेत. त्यामुळे महागाईचे विघ्न दूर कर आणि आमचे जगणे सुसह्य कर असे साकडे थेट विघ्नहर्त्या गणरायांनाच घालावे लागेल. बुद्धीची देवता असलेले गणपती राज्यकर्त्यांना जबाबदारी न झटकण्याची सुबुद्धी देतील, हिच अपेक्षा आणि प्रार्थना!
 
चैतन्यदायी आणि श्रद्धावान अशा गणेशोत्सवाला आज सर्वत्र नेहमीच्या उत्साहात सुरुवात होईल. राज्यात सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे थाटामाटात आगमन होईल. मराठी जनमानसात रुजलेल्या श्रद्धेचे रूप म्हणजेच गणेशोत्सव. पुढील दहा दिवस महाराष्ट्राच्या घराघरांत, गल्लीगल्लींत, गावागावांत चैतन्य, श्रद्धा आणि राष्ट्रीय व सामाजिक बांधिलकीचे अपार दर्शन होईल. मराठी माणूस आपले सगळेच सण-उत्सव दणक्यात आणि उत्साहात साजरे करीत असतो, पण गणेशोत्सवाची गोष्टच वेगळी आहे! मराठी मनाला ‘जिवंतपणा’ची प्रेरणा देणारे जे उत्सव आहेत त्यापैकी एक गणेशोत्सव. कालानुरूप त्यात जरूर बदल झाले आहेत, होत आहेत, पुढेही होतील. शेवटी बदलत्या काळाचे प्रतिबिंब जसे माणसाच्या जीवनात पडते तसे ते सण-उत्सवांमध्येही पडणारच. त्यामुळे गणेशोत्सवातही बदल दिसतातच. अर्थात या बदलांबाबत वैचारिक मतभेदांचे वारे दरवर्षी गणेशोत्सव आला की घोंघावतात. हे बदल नाकारणारे संख्येने खूप कमी आहेत, पण तरीही आपली नकारघंटा जोरजोरात बडविण्याचा हेका ते सोडत नाहीत आणि त्यामुळे निर्बंधांचा वरवंटा दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळांवर फिरतोच फिरतो. त्यात हिंदूंचे सण–उत्सव म्हटले की बंधने, हेटाळणी, टीका अशी विघ्ने हमखास येणारच. कधी मंडपांच्या लांबी-रुंदीवर निर्बंध, कधी लाऊड स्पीकरच्या कर्ण्यावर डेसिबलची मर्यादा कधी दहीहंडीच्या थरथराटावर बंधने, कधी न्यायालयाचा हातोडा, तर कधी प्रशासन व पोलिसांचे दंडुके. अशा अनेक अडथळ्यांची शर्यत हिंदूंच्या सण-उत्सवांना पार करावी लागते. गणेशोत्सवही त्याला अपवाद नाही. त्यात पर्यावरणवादी नावाचा आणखी एक अडथळा न चुकता दरवर्षी उभा राहत असतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींचे बोहरा समाजाशी हे नातं