Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग, एका जागी तर रावणाने स्वत: केली होती पूजा

महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग, एका जागी तर रावणाने स्वत: केली होती पूजा
, गुरूवार, 7 मार्च 2024 (05:30 IST)
देशभरातील करोडो महादेव भक्तांसाठी महाशिवरात्री हा दिवस महत्वपूर्ण असतो. यावर्षी महाशिवरात्री 8 मार्चला साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकरांच्या विविध मंदिरात श्रद्धाळु दर्शन करण्यासाठी येतात. भारतात 12 प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत. ज्यांपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व ज्योतिर्लिंग मंदिरात भक्तांची खूप मोठया प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळते. 
 
भीमाशंकर ज्योतिर्लिंग- महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 100 किमी दूर भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील 12 ज्योतिर्लिंगांमधील एक महत्वाचे ज्योतिर्लिंग मानले जाते. भीमाशंकर हे भव्य मंदिर सह्याद्रि पर्वतात 3,250 फुट उंचीवर स्थापित आहे. तसेच हे स्थान भीमाशंकर वन्यजीव अभ्यारण्यच्या जवळ असल्यामुळे हे ट्रेकर्सचे आवडते स्थान आहे. तसेच भीमाशंकर मंदिर सकाळी 4.30 वाजता उघडते व रात्री 9.30 वाजता बंद होते. 
 
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग -  नाशिक पासून 28 किमी दूर असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर ब्रह्मगिरि पर्वतात वसलेले आहे. या मंदिरात ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची छोट्या छोट्या लिंगामध्ये पूजा केली जाते. त्र्यंबकेश्वर मंदिर सकाळी 5.30 वाजता उघडते व संध्याकाळी 9 वाजता बंद होते.
 
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग- महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर यूनेस्कोच्या विश्व धरोहर स्थळ मध्ये सहभागी आहे. तसेच घृष्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतांना पुरुषांना आपले वरील कपडे काढावे लागतात. हे एकमात्र ज्योतिर्लिंग आहे जिथे भक्त आपल्या हातांनी शिवलिंगाला स्पर्श करू शकतात. हे मंदिर सकाळी 5.30 वाजता उघडते आणि रात्री 9.30 वाजता बंद होते. 
 
औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग- महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात महादेवांचे औंढा नागनाथ मंदिर आहे. जिथे नागनाथ ज्योतिर्लिंगची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की या मंदिरात पूजा केल्याने भक्त प्रत्येक प्रकारच्या विषापासून आपले रक्षण करू शकतात. औंढा नागनाथ मंदिर हे सकाळी 4 वाजता उघडते आणि रात्री 9 वाजता बंद होते.
 
परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग- महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात परळीमध्ये वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर विशेषकरून भगवान शकरांच्या भक्तांसाठी एक तीर्थ स्थळ मानले जाते. असे सांगण्यात येते की रावणाने या ठिकाणी भगवान शिवांची पूजा केली होती. परळी वैजनाथ हे मंदिर सकाळी 5 वाजता उघडते व रात्री 9 वाजता बंद होते. 
 
वैद्यनाथ लिंगाच्या स्थापनेबद्दल असे सांगितले जाते की एकदा राक्षस राज रावणाने हिमालयात स्थायिक होऊन भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. त्या राक्षसाने त्यांचे प्रत्येक डोके कापून शिवलिंगाला अर्पण केले. या प्रक्रियेत त्यांनी आपली नऊ मस्तकी अर्पण केली आणि जेव्हा ते दहावे मस्तक कापायला तयार झाला तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी पूर्वीप्रमाणेच रावणाची दहा मुंडके परत लावली. त्यांनी रावणाला वरदान मागायला सांगितले. रावणाने भगवान शिवाला हे शिवलिंग घेऊन लंकेत स्थापित करण्याची परवानगी मागितली. शंकरजींनी हे लिंग घेऊन जाताना जमिनीवर ठेवल्यास ते तिथे स्थापित होईल, असे बंधन घातले. 
 
रावणाने शिवलिंगासोबत चालत असताना वाटेत 'चिताभूमी'मध्ये लघवी करण्यासाठी ते लिंग एका अहिराच्या स्वाधीन केले आणि तो लघुशंकेतून निवृत्त झाला. येथे शिवलिंग जड असल्याने अहिरांनी ते जमिनीवर ठेवले. ते लिंग तिथेच स्थिर झाले. परत आल्यावर रावणाने त्या शिवलिंगाला मोठ्या ताकदीने उपटण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. शेवटी तो निराश झाला आणि त्या शिवलिंगावर अंगठा दाबून तो रिकाम्या हाताने लंकेला निघाला. येथे ब्रह्मा, विष्णू, इंद्र इत्यादी देवांनी तेथे पोहोचून त्या शिवलिंगाची विधिवत पूजा केली. तिथे देवी-देवतांनी भगवान शिवाला पाहिले आणि शिवलिंगाला पवित्र केले आणि त्यांची स्तुती केली. त्यानंतर ते स्वर्गात निघ़न गेले. हे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग माणसाला त्याच्या इच्छेनुसार फळ देणार आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विजया स्मार्त एकादशी 2024: विजया स्मार्त एकादशीचे महत्त्व, पूजाविधी जाणून घ्या