Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धगधगत आहेत नैनितालचे जंगल, उत्तराखंडच्या जंगलातील आग भयानक का होते आहे?

Nainital
, सोमवार, 29 एप्रिल 2024 (16:28 IST)
उत्तराखंड : उत्तराखंड मधील नैनितालच्या जंगलांमध्ये भीषण आग लागलेली आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे खूप प्रयत्न सुरु आहे. तरी देखील आग वाढतच चालली आहे. उत्तराखंडच्या जंगलांमध्ये शुष्क
वातावरण, मानवी गतिविधी, वीज कोसळणे आणि जलवायू परिवर्तन या कारणांमुळे  वारंवार आग लागण्याची समस्या निर्माण होत आहे. सरकार आणि प्रशासनाच्या अथांग प्रयत्नानंतर देखील या समस्येचा ठोस उपाय सापडला नाही. 
 
उत्तराखंडमधील नैनितालच्या जंगलांमध्ये मागील चार दिवसांपासून आग वाढत चालली आहे. आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घालणारे, घनदाट हिरव्या जंगली प्रसिद्ध पर्वत असलेल्या राज्यामध्ये ही आपत्ती निर्माण झाली आहे. जिने परिस्थितीचे तंत्रला बदलण्यासोबत अनेक वनस्पती आणि जीवांना संकटात टाकले  आहे. या वर्षी उष्णता वाढल्याने जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहे. स्थिती एवढी बिकट आहे की, भारतीय सेवा आणि एनडीआरएफ  मिळून जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. तर सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाबद्दल याचिका दाखल नयेत अली आहे. 
 
एयर फोर्सचे विमान भीमताल तलावातून बकेट मध्ये पाणी भरून  जंगलातील लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. जंगलातील आगीमुळे पर्वतांवरील हजारों हेक्टर जमीन जळून राख झाली आहे.एवढेच नाही तर नैनीताल परिसरात लागलेली आग हाय कोर्ट कॉलोनी पर्यंत पोहचली होती व या आगीला विझवण्यासाठी सेवा बोलवण्यात आली. रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारी जंगल आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन लोकांना अटक करण्यात अली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. व म्हणालेत की यावर लवकरच नियंत्रण मिळवले जाईल व सेनेची मदत घेतली जात आहे. 
 
*जंगलांमध्ये का लागते आग 
उत्तराखंडच्या जंगलांमध्ये आग गाण्याची समस्या खास करून फेब्रुवारी आणि जून दरम्यान लागते. कारण या दरम्यान वातावरण कोरडे आणि गरम असते. नैनितालच्या जंगलात आग लागण्याचे मुख्य कारण ओलावा कमी, वाळलेले पाने, अन्य ज्वलनशील पदार्थ, अति उष्णतेमुळे आग पकडून घेतात. अनेक वेळेस स्थानिक लोक तसेच पर्यटकांच्या हलगर्जीपणामुळे जंगलांमध्ये आग लागते. स्थानीय लोक चांगल्या प्रकारचे गावात उगण्यासाठी तसेच झाडे किंवा अवैध्य कटाई लपवण्यासाठी , शिकार इत्यादीसाठी जंगलांमध्ये आग लावतात. ज्यामुळे आग पूर्ण जंगलात पसरते. याशिवाय पर्यटक देखील सिगारेट तसेच इतर ज्वलनशील पदार्थ फिरायला जातांना फेकतात त्यामुळे आग लागते. तसेच प्राकृतिक कारणांनी देखील आग लागते. वाळलेली पाने यांसोबत विजेचे तारेचे घर्षण झाल्यामुळे देखील जंगलांना आग लागते. 

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

T20 World Cup 2024: T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ जाहीर,विल्यमसन कर्णधारपदी